माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा अंमलात येवून सव्वा वर्ष लोटले आहे. या कालावधीत इतर कोणत्याही कायद्यापेक्षा हा कायदा जनतेने आपला म्हणून मानलेला आहे असे दिसून येते. कारण या कायद्याने सर्वसामान जनतेची हतबलता जावून अन्यायाविरुद्ध लढण्याची मोठी प्रतिकारशक्ती ही तिला उपलब्ध झालेली आहे. आयोग आणि जनता यांच्यातला सूसंवाद हा सतत चालू रहावा या उद्देशाने आयोग स्वत:ची वेबसाईट सुरु करीत आहे. आतापर्यंत आयोग हा शासनाच्या वेबसाईटवर अवलंबून असायचा, पण आता स्वत:चीच वेबसाईट असल्यामुळे आणखी परिपूर्ण माहिती जनतेस उपलब्ध करुन दिली जाईल याचा मला दृढ विश्वास वाटतो.


विजय बा. बोरगे.
 
विलास पाटिल
 
विजय कुवळेकर